Friday, April 2, 2010

नको जाऊस इतक्यात साथ सोडून सखे तू......

नको जाऊस इतक्यात साथ सोडून सखे तू......
नको जाऊस इतक्यात साथ सोडून सखे तू......

तुझ्यात पार गुंतुण गेलो मी,
कशातही उरून न रहिलो मी……

नको जाऊस इतक्यात साथ सोडून सखे तू,
अधूरा राहीन मी.. जर गेलीस जीवनातून माझ्या तू......

हसू नकोस तू अबोल अशी,
येऊन जा एकदा माझ्या मनाशी.......

नजरेत माझ्या नजर मिळव एकदा,
दिसतील तुझ्याच प्रतिमा त्यात अनेकदा......

प्रत्येक वेळी स्वपनांत येते तू अशी,
जणू एक स्थान करून जाते हृदयाशी.......

तुझे स्मित हास्य देऊन जाते एक आशा जगण्याची,
त्यात नाही उरली आता भिती मरण्याची........

नको घेऊस परीक्षा आता माझ्या प्रेमाची,
देऊन जाईल आठवण ती निरंतर आपल्या नात्याची......

आता फक्त तू तिथ मी.... अन् मी तिथ तू,
मिळून जगु आयुष्य दोघे....
नको “मी”.... अन् नको तो “तू",
आता फक्त “आपण” अन् “आपणच” दोघे…..

माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,


माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...

सगळेच म्हणतात , मी तुझ्यासाठी चंद्र तारे घेउन येतो ,
त्यापेक्षा मी तुला चंद्र तार्यांवरच घेउन जातो ...
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...

मग आपनदेखिल चोरून चोरून भेटुया ,
लपून लपून मोबाइल वर बराच वेळ गप्पा मारुया ...
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...

तुला जर कधी एकटेपना भासेल तर ,
फक्त माझी आठवण कर मी तुझ्या जवळच असेन ...
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...

माझ्याशी बोलताना तू तुझे मन मोकळे करशील ,
आलेच तुझे अश्रु तर ते मी पुसेन ...
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...

तुझ्या दुःखात मी सुद्धा तुझ्या बरोबर असेन ,
पण माझ्या बरोबर असताना तुला दुखाची जाणीवच नसेन ...
आता तरी माझे म्हनने एकदा ऐकून बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन बघ ...

Saturday, March 27, 2010

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे, ,.,.


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे, ,.,.
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे........


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे

नातं तुझं माझं.......

नातं तुझं माझं.......
"नातं आपलं कप आणि बशीचं..
कपानं सांडलं तर बशीनं साठवायचं..
रात्रीच्या गोष्टींना सकाळी गुपचूप आठवायचं..
आठवता आठवता हळूच गालात हसायचं..

नातं आपलं चहा अन् दुधाचं..
दुधाबरोबर चहानं आनंदानं उकळायचं..
कधी रुसायचं, कधी हसायचं,
पण शेवटी एकमेकांच्या मिठीतच विसावायचं..

नातं आपलं हळव्या प्रेमाचं..
एकाला लागलं कि दुसऱ्यानं कळवळायचं..
एकाच्या कर्तृत्वाला दुसऱ्यानं नावाजायचं..
एकाच्या सुखदुःखात दुसऱ्यानं स्वतःला हरवायचं..

नातं आपलं साता जन्माचं,
सख्या का रे अस्वस्थ व्हायचं..
कधी गुरगुरायचं,कधी गोंजारायचं..
पण आपण सदैव बरोबरच रहायचं.." :-* :-*

लग्न

लग्न

लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचं कोंदण असतं
तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं
तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी समझोता तर कधी भांडण असतं
तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं
कपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी दोन मनांचं मीलन असतं
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं
संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं!

म्हणून तर बघा - I LOVE YOU

म्हणून तर बघा - I LOVE YOU ...
कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो

कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी

म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर
एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा
" I LOVE YOU "